Utkarsh Nagar water pipeline – जालना शहरातील उत्कर्ष नगर येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. पाईप लाईन न दिल्यास ११ जूनपासून आमरण उपोषणाचा इशारा राष्ट्रवादी महिला आघाडीने दिला.
उत्कर्ष नगरमध्ये पाईप लाईन द्या अन्यथा उपोषण – राष्ट्रवादी महिला आघाडीचा इशारा | Utkarsh Nagar water pipeline
जालना : जालना शहरातील उत्कर्ष नगर भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, राष्ट्रवादी महिला आघाडीने याबाबत मनपा प्रशासनाला आक्रमक इशारा दिला आहे.
जर ११ जून २०२५ पर्यंत पाईप लाईन टाकून पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर महिलांच्या वतीने मनपा समोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
विकतचे पाणी घेण्याची वेळ नागरिकांवर
उत्कर्ष नगर भागातील नागरिकांना विकतचे पाणी खरेदी करावे लागत आहे.
कारण, येथे पाईप लाईनच उपलब्ध नाही, आणि वार्डमधील पाण्याच्या स्रोतांमधून येणारे पाणी 4000 पेक्षा जास्त क्षारयुक्त असल्याने ते पिण्यायोग्य नाही.
यामुळे नागरिकांना पिण्यासाठी तसेच अंघोळीसाठीही विकतचे पाणी घेण्याची वेळ येतेय.
रोगराईचा धोका – आरोग्यावर परिणाम
अशुद्ध पाण्यामुळे या परिसरात कावीळ, डायरिया, केसगळती यांसारखे आजार वाढले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या गंभीर प्रश्नाबाबत पूर्वीही निवेदन दिले गेले होते, परंतु महानगरपालिकेने अद्याप काहीच कार्यवाही केली नाही, ही बाब संतापजनक असल्याचं महिला आघाडीचं म्हणणं आहे.
राष्ट्रवादी महिला आघाडीचा आंदोलनाचा इशारा
दिनांक २७ मे रोजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली,
शहर अध्यक्ष रिंकल तायड आणि माजी नगरसेविका मनकर्णा डांगे यांच्या नेतृत्वात महिलांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिलं.
त्यामध्ये पाईप लाईन टाकण्याची तातडीची मागणी करण्यात आली असून,
“जर प्रशासनाने दखल घेतली नाही, तर १० जूनपासून मनपा समोर महिलांच्या वतीने आमरण उपोषण सुरू केलं जाईल,”
असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्या महिला नेत्यांची उपस्थिती
या निवेदनावर रिंकल तायड, मनकर्णा डांगे, संगीता रोकडे, पुष्पाताई राऊत, मीरा हांडे,
शोभाताई डॉ. रेणुका खेडेकर, तेजस्वीनी बुंदेले, अंजली पिसे, मीरा खरात,
शोभाताई प्रेमभारती, बेबीताई त्रिवेदी, नीता जाधव, वर्षाताई ठोंबरे, दिपालीताई वानखेडे,
सुझाता औटे, लक्ष्मीताई केशापुरे, मनीषाताई केशापुरे, शारदा गोकुलवार, मीरा मोहिते,
अश्विनी चित्राल यांच्यासह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.
Read More : मित्तल नगरातील गोरगरिबांच्या अतिक्रमणावरून वाजेद पठान यांनी घेतला पुढाकार
One thought on “Utkarsh Nagar water pipeline – पाणीटंचाईवरून राष्ट्रवादी महिला आघाडीचा मनपाला इशारा”