जालना: जालना शहराच्या मंटा चौपुली परिसरात ११ डिसेंबर २०२३ रोजी घडलेल्या गजानन तौर हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणातील पाचवा संशयित आरोपी उमेश पवार याला अखेर तालुका पोलिसांनी खरपुडी येथून अटक केली आहे. याबाबत माहिती पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे.
या हत्येप्रकरणात यापूर्वी चार आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, रेकी करणारा आणि हत्येपूर्वी माहिती गोळा करणारा उमेश पवार फरार होता. अखेर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश उनवणे यांच्या नेतृत्वाखाली सचिन आर्य, मानसिंग बावरी, वसंत धस, चंद्रकांत माळी आणि राम शेंडीवाले यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
गजानन तौर यांच्या निर्घृण हत्येमुळे जालना जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पोलीस दलावर मोठा दबाव असताना आता पाचवा आरोपी अटकेत आल्यानंतर तपासाला वेग मिळाला आहे आणि आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Watch Realted Video On Youtube