भास्कर आबा दानवे यांचा दत्त नगर जालना येथे नागरी सत्कार सोहळा.

“तुम्ही सांगाल ते विकास काम करू” – नवनिर्वाचित नगरसेवक भास्कर आबा दानवे यांचे जालनावासियांना वचन

जालना: जालना शहर महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. प्रभाग क्रमांक १ मधून भाजपाला मिळालेल्या दणदणीत विजयाबद्दल दत्त नगर येथे नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी बोलताना पॅनल प्रमुख आणि ज्येष्ठ नेते भास्कर आबा दानवे यांनी नागरिकांच्या ऋणातून उतराई होत असताना, “तुम्ही सांगाल ते विकास काम करू,” असे भावूक आणि ठाम आश्वासन दिले.

दिग्गजांची उपस्थिती आणि सत्कार

दत्त नगर येथील नागरिकांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात भास्कर आबा दानवे यांच्यासह सौ. सुशिला भास्कर दानवे, सौ. पद्मा अजित मानधनी, सौ. ज्योती रवि सले आणि कल्याण भदनेकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिक भैय्या दानवे, कपिल दहेकर, माजी नगरसेविका जागृती यादव, विजय कामड, विनोद यादव, रवि सले, नंदलालसेठ तलरेजा, सुखदेव बजाज आणि रावसाहेब जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

विकासाची नवी पहाट: आबांनी दिली कामांची पावती

सत्काराला उत्तर देताना भास्कर आबा दानवे यांनी यापूर्वी परिसरात केलेल्या कामांचा आढावा घेतला. ते म्हणाले की:

“दत्त नगर परिसरात आम्ही यापूर्वी ड्रेनेज लाईन, सिमेंट रस्ते, मंदिर परिसरातील संरक्षण भिंत आणि विद्युतीकरण यांसारखी महत्त्वाची कामे मार्गी लावली आहेत. जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला तडा जाऊ न देता उर्वरित सर्व विकासकामे येत्या काळात प्राधान्याने पूर्ण केली जातील.”

पाण्याचा प्रश्न सुटणार; पंकजा मुंडे यांनी दिली मंजुरी

परिसरातील पाणी साचण्याच्या गंभीर प्रश्नावर बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली. मोढ्यातून गायत्रीनगर, महेश नगर आणि रॉयल नगर येथे पावसाळ्यात घरात शिरणारे पाणी आता कन्हैयानगर व कुंडलीका नदीत सोडण्यात येणार आहे. या कामासाठी राज्याच्या नेत्या आणि पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी मंजुरी दिली असून, येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती आबांनी दिली.

नागरिकांचा उत्साह आणि आभार

कार्यक्रमाचे नियोजन संजय निकम, रवि जगताप, लक्ष्मण डकले, विठ्ठल ठोंबरे, राजेंद्र गजर, अभयकुमार यादव, राजेश व्यास, संजय राठोड, रेखा सिरसाट, शिवाजी लेंडीकर यांच्यासह समस्त दत्त नगरवासीयांनी केले होते.

यावेळी रामेश्वर काटकर, जगन्नाथ गुंजाळकर, प्रितेश यादव, भगवान गुंजाळकर, वंश यादव, प्रकाश हिवाळे, सारांश यादव, आदित्य डुरे, सोन्या काटकर, विजय महाजन, भाग्यवंत काटकर, दिलीप कोल्हे, अँड. सौ. रत्ना यादव, संध्याताई सोनूने आणि मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी जगताप यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमोल कुलकर्णी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top