छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : अहिर गवळी समाजाचा १३ वा भव्य सामूहिक विवाह सोहळा अक्षय तृतीयेच्या पावन पर्वावर छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषद मैदानावर उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात एकूण १० वर-वधू जोडपी विवाहबंधनात अडकली असून समाजाच्या एकतेचा आणि संस्कृतीचा हा लोकोत्सव ठरला आहे.
सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता.
बारात्यांसाठी आणि बाहेरगावाहून आलेल्या पाहुण्यांसाठी उत्कृष्ट निवास व भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती. सकाळी चहा-नाश्ता तर दुपारी आणि संध्याकाळी स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद उपस्थितांनी घेतला.
या प्रसंगी कन्यादान समितीच्या वतीने प्रत्येक जोडप्याला ५ भांडी व अन्य उपयुक्त वस्तू भेट देण्यात आल्या. तसेच स्थानिक मंत्री, लोकप्रतिनिधी आणि माजी आमदारांच्या हस्ते नवविवाहित जोडप्यांना १० कपाट, सिलाई मशीन, स्मार्ट टीव्ही, कलर सेट, वॉटर प्युरिफायर (एक्वा गार्ड) यांसारखी आधुनिक उपकरणे व भेटवस्तू कडून दिल्या गेल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सुनील सुंदरलाल बागवाले (अध्यक्ष, सामूहिक विवाह समिती, संभाजीनगर) होते, तर महिला अध्यक्ष म्हणून सौ. संगीता शंकरलाल पहाडिये यांनी मार्गदर्शन केले.
समारोहाचे संयोजन श्री. चेतन भैय्या जागंडे (सचिव) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडले.
या वेळी डॉ. हंसराज डोंगरे, प्रेम गौरक्षक सिताराम पहाडिये, मोहन मेघावाले, भरत रोत्रे, अॅड. संजय डोंगरे, मंगेश डोंगरे, राजेश डोंगरे, मोहन नंदवशी, गंगालाल सिद्ध, संदीप दिपवाल, मनोज फतेलषकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागतकर्ते होते वीर बलराम क्रीडा मंडळ, रंगारगली, छत्रपती संभाजीनगर.
समाजबांधवांनी एकत्र येऊन प्रेम व सौहार्दाने या सोहळ्याचा आनंद घेतला आणि नवविवाहितांना शुभाशीर्वाद दिले.
विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा: